Tuesday 31 May 2011

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत योगऋषी प.पू. रामदेवबाबा आंदोलन चालूच ठेवणार - आचार्य पू. बालकृष्ण

नवी दिल्ली, ३० मे (वृत्तसंस्था) - विदेशातील ४०० लाख कोटी रुपयांचे काळे धन भारतात परत आणावे आणि शासनाने भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी प्रयत्न करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी योगऋषी प.पू. रामदेवबाबा ४
जूनपासून आमरण उपोषण चालू करणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात प.पू. रामदेवबाबा यांचे ९ दिवसांचे योगशिबीर आहे, तर जंतरमंतर या ठिकाणी उपोषण चालू रहाणार आहे. या आंदोलनाविषयी माहिती देतांना, पतंजली योगपिठाचे आचार्य बालकृष्णन यांनी सांगितले की, जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत योगऋषी प.पू. रामदेवबाबा आंदोलन चालू ठेवणार आहेत. आचार्य पू. बालकृष्ण पुढे म्हणाले, ''आमचा संघर्ष भ्रष्टाचाराच्या विरोधात, काळे धन भारतात परत आणणे आणि विद्यमान व्यवस्था पालटणे यांसाठी आहे. केंद्रातील शासन जोपर्यंत या सव् सूत्रां [...]



No comments:

Post a Comment